Browsing Category

Articles


VIEW POST

View more
Articles

Vulnerability of school kids

By on August 25, 2024

Vulnerability of School – going kids

Praveen Dixit

DGP (Retired) Maharashtra State

Recent incidents of sexual assault at a school on young school going kids of 3-4 years in Badlapur near Mumbai and rape and murder of resident   doctor at R.G.Kar public hospital at Kolkata shocked the public conscience through out the country. In both the incidents, the culprits had free access to isolated places within the public institutes and were successful in executing their obnoxious activities without being noticed. At the school in Badlapur, the kids of 3-4 years could not even understand what atrocity was being committed on them for a prolonged period of fifteen days. In R.G. Kar hospital, the culprit murdered the victim after rape and thus the victim would never be able to inform about the sad happenings. While the investigation in Badlapur incident is being conducted by Special Investigation Team (SIT) appointed by Maharashtra government, the R.G.Kar incident is investigated by CBI . At both incidents, the culprits had selected places where there was no arrangement for CCTV footage which would have helped in getting detected. Both places were completely isolated even though in public institutes and thus there are no witnesses. In the incident at Badlapur school, when the young kid complained about her pain in private parts, the parents didn’t refer her to private doctors for examination, even though that would have revealed the damage helping for further legal action. When the matter was brought to the notice of head mistress, she didn’t reveal it to school authorities for three- four days.  Authorities also failed in informing the matter to police immediately as required under POCSO Act. When the matter was referred to police, they sent the kids to public hospital for examination, recorded the statements of parents and registered the offence after twelve hours. Investigation revealed, the suspect was employed as casual contract sweeper two weeks ago and was moving freely even in ladies’ toilets without any identity card. The contractor didn’t verify his antecedents before using him as contractual labour.

The Bombay High Court directed the police to register an offence against the school authorities for their failure to inform about the incident immediately. The Court also underlined the need to sensitise the police about offences against children. In offences against women and children, police may be first respondents, investigators or officers to register F.I.R. It is primary duty of the police to create awareness of the legal rights   among the victims, play active role in preventing these crimes and detect and investigate these crimes. Many women are unaware of the system to redress these grievances and are reluctant to register a complaint due to shame and ignominy associated with these crimes. While knowledge and skills to investigate are imparted during training, it is imperative that the focus of training should be broadened from ‘knowledge and skills ‘to include attitudinal transformation as an important component. When the complainant approaches the police, police behaviour would determine how the complainant would react and cooperates with them. Attitude reflects in behaviour and it can be changed by training.

To ensure fairness, police need to take following precautions: who receives the complainant first in the police station? How much time is taken to write down the complaint, whether the complaint is recorded as mentioned by her or reduced in gravity, whether the complaint is recorded in the words and language as mentioned, whether audio-visual recording is done of the complainant, whether there was any demand of illegal gratification. In each complaint by a woman or about a child -girl, the DCP should contact the complainant subsequently and verify above details and keep a record of the same. Awareness also needs to be created about the facility of e-FIR under the recently implemented Bharatiya Nyaya Sanhita (BNS)2023. This facilitates lodging the complaint without visiting to police station.

Educational authorities also need to pay attention to requirements of security during their visits to schools. They need to emphasise on immediate reporting of every incident against the child to police even though it may appear to be embarrassing them. Similarly, it is necessary to review the policy of using contractual labour for house-keeping. Though it may save the institute from paying retirement benefits to the employee, but the cost of such contractual workers’ behaviour is more damaging to the institute.  

As far as assaults against health workers in public hospitals are concerned, I was given the task to review the security requirements of medical colleges and hospitals in Maharashtra. Accordingly, trained personnel from Maharashtra Security Force (MSF) were deployed for surveillance, monitoring as well as quick response. They were also equipped with necessary equipment, CCTV facilities and weapons to prevent any unfortunate incidents. This arrangement is working effectively for last seven years. This system in force in Maharashtra needs to be emulated in other states in India as well.

**************   *************   *************

 

 

 

 


VIEW POST

View more
Articles

Badlapur incident

By on August 25, 2024

बदलापूरची घटना

प्रवीण दीक्षित.

(निवृत्त पोलीस महासंचालक)

बदलापूर येथील शाळेतील तीन-चार वर्षाच्या दोन छोट्या मुलींवर शाळेने पंधरा दिवसापूर्वीच कंत्राटाने नेमलेल्या कर्मचार्‍याने दुष्कृत्य केल्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. मुलींच्या पालकांनी ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांना दिल्यानंतरही चार दिवस त्यांनी त्याबद्दल पोलीस ठाण्यामधे तक्रार दिली नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर एक दिवसानी पोलीसांनी प्रथम खबरी अहवालाची नोंद केली. ह्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेऊन कंत्राटदारास चौकशी न करता कर्मचार्‍यास नेमल्याबद्दल काळ्या यादीत टाकले. मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आले. शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली व तीन पोलीस अधिकार्‍यांना कामातील हलगर्जीपणासाठी निलंबित करण्यात आले.

ह्या घटनेने महिला व लहान मुली ह्यांच्याविरुद्ध होणार्‍या तक्रारी/गुन्हे ह्यांच्याबाबत पोलीस तक्रारदारांशी वागताना सौजन्य आणि संवेदनशीलता दाखवतात का? हा महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांबाबतच्या तक्रारींमधे, आपण अत्याचाराचे बळी आहोत हे सांगताना वाटणार्‍या अपराधीपणाने, लोकलज्जेस्तव महिला तसेच लहान मुलींचे पालक त्याविरुद्ध तक्रार करायला धजावत नाहीत. बर्‍याचवेळा आपल्याला न्याय कसा मिळवता येईल ह्याबाबतही अनभिज्ञता असते. त्यामुळे पोलीसांचे कर्तव्य आहे की, समाजात स्त्रिया / बालिकांविरुद्ध गुन्हयांबाबत जागरुकता निर्माण करणे, हे गु्न्हे होणार नाहीत ह्यासाठी सक्रीय प्रयत्न करणे व अशा गुन्ह्यातील आरोपी शोधून सदर घटनेचा तपास करून न्यायालयात सादर करणे. अशा घटनांमधे सर्व प्रथम कारवाई करणारे, तपास करणारे वा ठाणे अम्मलदार म्हणून प्रथम खबरीची नोंद घेणारे म्हणून पोलीस ओळखले जातात.

ज्या वेळेस आपण पोलीसांची वागणूक योग्य असावी असे म्हणतो त्यावेळेस पोलीसांना तपास करण्याची उत्तम माहिती, व्यवसाय कौशल्य व योग्य वागणूक व दृष्टिकोन अपेक्षित आहे. पोलीसांना पीडितेबद्दल संवेदनशीलता, विशिष्ट गुन्ह्यात तपास करायची पद्धत, पीडित व साक्षीदारांना संरक्षण आणि गुन्ह्यांचे न्यायालयासमोर योग्य सादरी करण करणे ह्याचे ज्ञान असावे असे अपेक्षित आहे. पोलीसांना कौशल्यामधे भरभक्कम पुरावा गोळा करणे, गुन्ह्याचा तपास करणे, पीडितेला वेळेवर व उचित नुकसानभरपाई मिळवून देणे व पीडितेचे पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. पोलीस तक्रारदारांना कसे वागवतात ह्या त्यांच्या वागणुकीतून त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांना परिणामकारक सल्ला देणे, कामात मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण व दृष्टिकोन बदल करण्याच्या उपाययोजना अपेक्षित आहेत. दृष्टिकोन म्हणजेः जाणीवपूर्वक, घडणार्‍या गोष्टी, माणसे, वस्तू, घटना ह्यांच्या बाबत सकारात्मकतेने किंवा नकारात्मकतेने विचार करणे.

पोलीस प्रशिक्षणात ज्ञान व कौशल्ये शिकविण्यावर भर दिला जातो. मुंबई उच्च न्यायालयाने अधोरेखित केल्याप्रमाणे गरज आहे ती पोलीस प्रशिक्षणात आमूलाग्र बदल करून वागणूक व दृष्टिकोन बदलण्यावर भर देण्याची व ते सकारात्मक करण्याची. महिला किंवा बालिकेचे पालक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात तेव्हा पोलीस त्यांच्याशी कसे वागतात त्याप्रमाणे तक्रारदार किती सहकार्य करणार किंवा काय प्रतिक्रिया देणार ते ठरत असते. हे करत असताना पोलीसांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे की, महिला/पालक तक्रार करायला येतात तेव्हा सर्वप्रथम कोण भेटते, तक्रार लिहून घेण्यास किती वेळ लागतो, तक्रार सांगितल्याप्रमाणे लिहीली जाते का, तक्रारीचे गांभीर्य कमी करून लिहीली जाते का, त्याचप्रमाणे तक्रार जशी सांगितली जाते त्या भाषेत व त्या शब्दात लिहीली जाते का, तक्रार लिहून घेताना दृक-श्राव्य माध्यमाचा उपयोग केला जातो का, तक्रार घेताना लाच मागितली गेली होती का? पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने हया गोष्टी स्वतंत्रपणे तक्रारदाराशी संपर्क करून तपासून पाहिल्या का? व तशी नोंद ठेवली का? हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बदलापूरसारखी घटना पुन्हा होऊ नये ह्यासाठी सर्व पोलीस अधिकार्‍यांना वरील गोष्टी वारंवार सांगणे गरजेचे आहे. असेच प्रशिक्षण शाळांचे मुख्याध्यापक, महिलांच्या निवासस्थानांचे संचालक ह्यांनाही देणे गरजेचे आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासन ह्यांनी विविध स्तरांवर अपेक्षित कारवाईबद्दल सविस्तर शासन निर्णय नुकतेच पुन्हा प्रसृत केले आहेत. त्यांची काटेकोरपणे अम्मलबजावणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर लहान बालिकांबद्दलची संवेदनशीलता लक्षात घेऊन कंत्राटी कामगार नेण्याची पद्धत रद्द करून त्याठिकाणी प्रशिक्षित व विश्वासू कर्मचारी नेमण्याचा सुद्धा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

—————————————————————

 


VIEW POST

View more
Articles

नेमकी शस्त्रे कशासाठी आहेत?

By on August 13, 2024

दखल शस्त्रे नेमकी कशासाठी?


                   प्रवीण दीक्षित,

 निवृत्त पोलिस महासंचालक


              अलिकडे महाराष्ट्र गंभीर घटनांनी हादरुन गेला. शस्त्रांचा वापर करत केलेले जीवघेणे हल्ले हे काहींना संपवून तर काहींना जखमी करुन गेले. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर आदी ठिकाणच्या घटना पाहता त्यामागे वैयक्तिक कारणे आणि वैमनस्य दिसून येते. त्यामुळे त्याला टोळीयुद्ध म्हणण्याचे वा समजण्याचे कारण नाही. अर्थात या निमित्ताने शस्त्र परवाना धोरण वा शस्त्रांची हाताळणी या विषयावर मात्र पुन्हा विचार करावा लागेल.


                मुंबई, ठाणे, पुणे,नागपूर आदी महानगरांमध्ये तसेच इतरत्रही परवानाधारक शस्त्रातून गोळीबाराच्या घटना घडत असून, ती चिंतेची बाब आहे. यातून कुठे मृत्यू तर कोणी जखमी होण्याच्या बातम्या वारंवार कानावर पडत आहेत. यास कुठलेही शहर अपवाद नाही. त्यामुळेच हल्लेखोरांकडे इतयया सोयिस्कर पद्धतीने शस्त्रे येतात कशी हा विचार मनात येतो. आपल्याकडे शस्त्र कायद्यानुसार जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्तालय असेल तिथे पोलिस आयुक्त यांना शस्त्र परवानगी देण्याचे अधिकार आहेत. यामध्येही जिल्हाअंतर्गत जिल्ह्याबाहेर असे दोन प्रकार आहेत. आधी शस्त्रे बाळगण्यासाठी संबंधित अर्जदाराने दिलेले कारण तसेच त्याच्या जीवाला असणारी भीती याबाबत पडताळणी केली जाते. चौकशीअंती ठरावीक काळासाठी परवाना मिळतोवेळोवेळी त्याचे नूतनीकरण करावे लागते. परवानाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांनाही परवाना सहज मिळू शकत नाही. त्यांनाही सर्व प्रक्रिया पार करूनच परवाना दिला जातो. ही झाली शस्त्रे बाळगण्याची कायदेशीर पद्धत.

 मात्र, माफियांना गावठी, विदेशी पिस्तूल बेकायदेशीर मार्गाने सहज उपलब्ध होताना दिसत आहेतबंदुकीच्या धाकाने उद्योजक, व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातील मंडळींना खंडणीसाठी धमकावले जाते. याच भीतीतून स्वसंरक्षणासाठी ही मंडळी शस्त्र परवान्याची मागणी करतात. दुसरीकडे माफिया, खंडणी मागणारे, दहशतवादी, माओवादी यांना बहुतांश शस्त्र चीन आणि पाकिस्तान सीमेपलीकडून मिळताना दिसतात. पाकिस्तानने तर उघड उघड ड्रोनच्या मदतीने देशविघातक शक्तीपर्यंत शस्त्र पुरवल्याचेही समोर आले आहे. 


                  हे लक्षात घेता अशा घटनांना आळा घालायचा तर बेकायदा येणारी शस्त्रे, त्यांचे माध्यम, ठिकाणे शोधून कठोर कारवाई करायला हवी. शस्त्र देणार्या अधिकार्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळताच संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांवर तातडीने कारवाई करायला हवी. जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल. सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने शस्त्र परवाना धोरणात, काळाप्रमाणे योग्य ते बदल करण्याची वेळ आता आली आहे, हेच अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगता येईल.
अर्थात एका जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये कडक धोरण राबवत शस्त्र परवाना देण्याचे ठरवले तरी, नागरिक दुसर्या मार्गाने भ्रष्टाचार करून तसेच त्यांना राजकीय दृष्टीने अनुकूल भागातून संपूर्ण देशामध्ये वापरता येईल असा शस्त्र परवाना मिळवतात. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बरीचशी शस्त्रे मिळवली आहेत.काही वर्षांपूर्वी  काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शस्त्र परववाने देण्यात आले होते राजकीय दबावाने अथवा भ्रष्टाचाराने ती मिळवली आहेत. ती देशभर कुठेही वापरण्याच्या परवान्याची असतात. आज हेच लोक ती घेऊन मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात वावरतात. म्हणूनच महाराष्ट्राबाहेरचे शस्त्रपरवाने काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. खेरीज कोणत्या जिल्हाधिकार्याने शस्त्र दिले हे जाणून घेऊन त्यांच्याकडेही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण एखादी नोकरी मिळवण्यासाठी वा अन्य लाभ घेण्यासाठीही लोक शस्त्रपरवान्याची विनंती करतात. त्यामुळेच परवाने धारक व्यक्तीला खरोखरच स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगणे आवश्यकत आहे का? याची पुन्हा एकदा तपासणी व्हायला हवी. पूर्वी अशी तपासणी अवघड होती. मात्र आता तंत्रज्ञान बरेच पुढे गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही आयुक्ताला दुसर्या राज्यातील आयुक्ताशी संपर्क करुन यासंबंधी माहिती घ्यावीशी वाटली तर फारसे अवघड नाही.
शस्त्रपरवान्याविषयीची माहिती आयुक्त वा जिल्हाधिकार्यांलाच ठाऊक असते. पण आता यात महत्त्वपूर्ण बदल घडणे गरजेचे आहे. तुम्ही शस्त्रपरवाना दिला तर तो स्थानिक पातळीवर आहे की संपूर्ण देशपातळीवरील आहे, यासंबंधीचा खुलासा तातडीने गृहमंत्रालय आणि सर्व जिल्हांच्या अधिकार्यांना कळवायला हवा. त्यासाठी भारत सरकारने एक पोर्टल तयार करणे गरजेचे आहे. ज्यावर सर्व शस्त्रधारकांची माहिती, त्यांचा आधार क्रमांक ही माहिती सहज मिळेल.  यामुळे कोणाकडे परवानाधारक शस्त्रे आहेत ही माहिती पारदर्शक पद्धतीने सर्वांना उपलब्ध होईल. राज्यवार, जिल्हावार अशी माहिती असेल तर अनेक गोष्टींची स्पष्टता होऊ शकेल. उदाहरणार्थ, एखाद्याकडे परवाना असणारे शस्त्र असेल आणि त्याने ते कोणा दुसर्याला दिले तर लगेचच तपासता येईल. सध्या अशी पडताळणी करणे वेळखाऊ आहे.  एखादे शस्त्र त्या धारकाचे आहे की नाही आणि ते परवाना असणारे आहे की नाही यासंबंधी कळणे सध्या अवघड आहे. मात्र माहितीमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे. 


                 यासंदर्भातील आणखी एक बाब म्हणजे काही जमातींचा पारंपरिक व्यवसायच शस्त्र बनविण्याचा आहे. ते कुठलेही शस्त्र हुबेहूब बनवतात आणि सर्रास त्यांची विक्री करताना दिसतात. पाकिस्तानसारख्या काही देशांमध्ये शस्त्रांचा बाजार भरतो. तिथे एके 47 पासून सर्व प्रकारची शस्त्रे मिळतात. भारतातही अनेक ठिकाणी अशीच शस्त्रे मिळताना दिसतात. त्याठिकाणी कठोर कारवाई करत शस्त्र तयार करणार्या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यामुळेही अयोग्य व्यक्तींच्या हाती शस्त्रे येण्यास पायबंद घालता येईल. सार्वजनिक शांतता, उत्कृष्ट सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांनी आणि न्यायालयाने कठोर भूमिका घेत कारवाई करायला हवी.
ड्युटीवर असताना पोलीस अधिकार्यांकडे शासकीय सर्व्हिस रिव्हॉलवर उपलब्ध असते परंतू ती व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचे गुन्हेगार जाणून असतात. त्यामुळेच त्या अधिकार्यांवर लक्ष ठेवून गुन्हेगार पोलिसांचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. दुसरीकडे सतत गुन्हेगारी कृत्यांसंदर्भात काम करणार्या पोलीस अधिकार्यांना सुलभ पद्धतीने शस्त्रपरवाना मिळत नाही. ते मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता अशा अधिकार्‍यांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्रपरवाना देणे आवश्यक आहे, ज्या ठिकाणी पोलिस ठाण्यावर हल्ला करून शस्त्रे पळवली असतील, ते प्रत्येक शस्त्र परत मिळवणे गरजेचे आहे. 


              शस्त्रांचा वापर करुन जीवे मारण्याच्या ताज्या घटनांद्वारे वाढत्या गुन्हेगारीची बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण इथे लक्षात घ्यायला हवे की मुंबई, उल्हासनगर, ठाणे वा पुणे येथे घडलेले गुन्हे वैयक्तिक वैमनस्यातून झाले आहेत. याला कोणत्याही प्रकारे टोळीयुद्ध म्हणणे वा तसे स्वरुप देणे योग्य नाही. पैशाचे व्यवहार, वैयक्तिक आरोप, वैमनस्य आदी कारणांमधून हे गुन्हे घडल्याचे समजून येते. त्यामुळेच अलिकडे घडलेले हे गुन्हे म्हणजे टोळीयुद्धाची सुरूवात आहे, असे म्हणता येणार नाही. अगदी घोसाळकर हल्ला प्रकरणातही कोणी नगरसेवक व्हायचे, कोणी राजकीय पुढारीपण मिरवायचे या स्वरुपातील वैयक्तिक कारणांमुळे असलेले वैमनस्य समोर येते. या लोकांकडून छोटेमोठे गुन्हे घडत असतात तेव्हा तपास करताना त्यांच्या रेकॉर्डमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी समजते. अशा तुरुंगात असणार्या वा तुरुंगातून बाहेर असणार्या गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या लोकांनी अनेक शत्रू निर्माण केलेले असतात. त्यामुळेच हा गुन्हेगार तुरुंगातून कधी बाहेर येतो आणि कधी आपण याला संपवतो याची त्यांचे शत्रू वाटच बघत असतात. त्यामुळेच अगदी पॅरोलवर बाहेर असले वा शिक्षा संपवून बाहेर आले असले तरी पोलिसांनी त्यांच्यावर सतत नजर ठेवणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांनी या लोकांनाही तुझ्या जीवाला धोका असल्याची समज देणे गरजेचे आहे


              शस्त्रे आणि अमली पदार्थांचे व्यवहार यांचा निकटचा संबंध आहे. यातून शस्त्रांचे मोठमोठे व्यापार होतात. आत्तापर्यंत झालेल्या तपासातून वारंवार ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळेच या बाबीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करीवर, विक्रीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तरच अशा घटना कमी होणे शयय होईल. दुसरे म्हणजे गावठी कट्टे बनवणार्या शिकलगार समाजासारख्या लोकांचे पुनर्वसन करणेही गरजेचे आहे. आजही हे लोक आपापल्या वस्तीमध्ये शस्त्रे बनवून विकत असतात. त्यामुळेच त्यांची ओळख पटवून, त्यांना योग्य ती मदत देऊ करत पुनर्वसन घडवून आणले तर हे लोक शस्त्रे बनवणार नाहीत. बरेचदा शस्त्रे, दारुगोळा निर्माण करणार्या कारखान्यातूनही शस्त्रास्त्रांची चोरी होते. हेदेखील तातडीने बंद व्हायला हवे कारण पुढे हीच चोरीची शस्त्रे गुन्ह्यांसाठी वापरली जातात. अशा विविध पातळ्यांवरुन प्रयत्न केले तरच गुन्ह्यांमध्ये शस्त्रांचा वापर कमी होणे शयय होईल.


  (शब्दांकनस्वाती पेशवे) (अद्वैत फीचर्स)


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Articles

Juveniles in serious crimes

By on August 5, 2024

Juveniles in serious crimes

Praveen Dixit

(DGP retired, Maharashtra State)

Memories of horrible incidents such as Nirbhaya episode in Delhi are never

forgotten. Unfortunately, similarly terrible happenings are being reported from urban as well

as rural areas and from all states without any exception. In few occasions, it is an incident of

gang rape on helpless especially abled destitute, small girl belonging to scheduled cate or

scheduled tribe, or rape on a girl after deceiving her with false identity. In some instances, the

kids are not even able to narrate who committed the atrocities, but keep on complaining of

severe body /stomach pain. Invariably, videos are made of such heinous happenings and if the

victim is alive, she is constantly blackmailed and the heinous act is repeated several times. In

most of these cases, the perpetrator is grandfather, step-father, cousin, relative or a person

claiming to be close to the family. The offender may be working as security guard,

housekeeping staff in housing society/school, cleaner, driver or conductor in school buses. If

the victim refuses to marry, she is murdered ruthlessly and the body is disposed of in a remote

place. Persons who commit these offences against children are dealt with under the

provisions of The Protection of Children from Sexual Offences Act (POCSO). Many of these

acts are committed by juveniles in the age group of 16-18. These juveniles are committing

gang rapes, rapes, dacoities, murders and thefts. In addition, incidents of rash and drunk

driving by juveniles from wealthy families in posh cars resulting in death of innocent

pedestrians or two-wheeler riders are being increasingly reported.

 

Invariably, these incidents result in hue and cry and electronic and print

media demand explanations from law enforcing authorities and seek explanation from the

government for its effectiveness. Many a times, the public anger goes to the extent of

demanding immediate hanging of the accused even though the suspect may be juvenile.

National Crime Record Bureau (NCRB) which compiles data of these offences from all states

 

reveals increasing number of incidents involving juveniles in the age group of 16 to 18 as

suspects. As per the Juvenile Justice Act (JJA) 2015, a person below the age of 18 is

considered as juvenile. The JJA further provides for minors in the age group 16 – 18 years to be

treated as adults in the case of heinous crimes. Heinous crimes are those offences where

punishment is more than seven years. Decision regarding an offence whether it is heinous or

otherwise is taken by Juvenile Justice Board consisting of Judicial Magistrate First Class, and

two other social workers out of which one is a woman. The object of the Actis to ensure the

needs of children and protect their human rights fully. The second part deals with the care,

protection and rehabilitation of children in need. Protection includes protection from harm to

the life of a child, even from the parents and relatives. The children/victims should not be

produced before multiple authorities and protect the interest of the victims of the sexual

offence.

 

Important factors which contribute in making children juvenile include

absence of care and affection from parents because of divided family, large family and

poverty resulting in absence of facilities. In view of urbanization, and easy availability of

access to internet, children witness which they should not or get addicted to porn/violence

videos. Many of these are also addicted to watch online games which encourage them to

commit suicide or shooting as adventure. Today social media platforms including Instagram,

WhatsApp, Telegraph and many others are attracting young minds towards darknet which is

full of spreading falsehoods, radicalising them to fundamentalism, and encouraging them to

indulge in investing large amounts in bitcoins. There are several incidents when young girls

have fallen prey to flirting and have been deceived with ulterior motives. Several countries

including USA, Canada, Australia are contemplating seriously to make enactment where

children below 14 would be prevented from having free access to internet. Social platforms

are likely to implement these reforms in these countries immediately and across the world

 

from January 25. There is adverse impact of advertisements and serials on TV/OTT and

cinemas. After watching films with violence/ porn, children have made efforts to follow these

in reality and ended up in remand homes. In red light areas, women force children to go

outside at the time of business and these children fall in bad companies. Children become

addicts to bad habits including drugs, drinks, smoking and other objectionable materials.

Adolescent children try to impress their female friends and to satisfy various requirements

particularly under the influence of drinks/drugs, do not hesitate to commit thefts/heinous

offences. Either due to anger against their parents for petty reasons, or because of luring by

someone including women to provide an opportunity to work as model, or higher education,

or job or marriage, thousands of very young girls under the age of 18 have been noticed

leaving their parents. Very few of these are traced and it is speculated that these might be

ending in some brothels or might have been killed or transported to war zones including

Syria, Afghanistan and other places.

 

Analysis of undertrial juveniles reveals from their statements that most of

them were from deprived background. All of them had either dropped out from school or they

were never regular to school. As a result of lack of education or no vocational skills, many of

them were working as casual labourers. Due to dysfunctional families, these children had no

mental or social support from their families. Family situation of undertrials was characterised

by poverty, children forced into labour, inadequate parenting and their families were under

continuous stress or there was sudden crisis like death, desertion etc. NCRB data underlines

increasingly children from affluent families, having parents who do not pay attention to their

upbringing, are indulging in heinous crimes, due to drug addiction. In addition, religious

fanatics are noticed to be providing large funds and using these youth to deceive young girls

and converting them under compulsion.

 

Though these children might have come in conflict with law, it is necessary

that police officers remain sensitive to their plight. As Commissioner of Police in Nagpur, I

ensured that these children are provided counselling by social workers. Those who were

eligible to attend schools, were sent there. Others were provided vocational skills including

driving. They turned out to be responsible persons and contributed to the income of their

families. Similar initiatives are taken by many police officers. It is imperative that even after

the change of unit in charge, these well minded initiatives are continued for a long time. It

should be an effort of policemen to move the Juvenile Justice Board for action against parents

of such children and safeguard them from adult offenders who might be forcing such children

to resort to offences. Invariably, assistance should be taken from voluntary organisations, or

child psychiatrists, child guidance clinics, social care workers, and probation officers to cure

the cause behind such incidents. Police officers should also visit shelter homes/remand homes

frequently to ensure adequate support and security is available at these places. Efforts should

be made to detect such children at pre-delinquent situation and isolate destitute and neglected

children. In a town, geographic areas which are breeding grounds of delinquency may be

identified and these should be regularly patrolled. My initiative in organising recreational

programmes, including sports, holiday camps, band displays had created enthusiasm among

one and all. While working as DGP, Maharashtra, we had initiated regular interaction with

radicalised youth including young girls. Assistance was taken from seniors in their

community and we persuaded them to realise the dangers of joining ISIS. In spite of these,

there were instances when these youth managed to leave for Syria and were caught there or

got killed in war-zones.

 

To conclude, holistic approach, combining enforcement with compassion and

proactive intervention, can help rehabilitate at-risk youth and prevent them from becoming

entangled in criminal activities.

 

***************   *************  ******************


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Articles

बालगुन्हेगारीत बालक कोणाला म्हणायचे हा चिंतेचा विषय

By on July 30, 2024

बालगुन्हेगारीत बालक कोणाला म्हणायचे हा चिंतेचा विषय

माजी पोलीस महासंचालक डॉ प्रवीण दीक्षित यांचे परखड मत
हिंदू महिला सभेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका डॉ अनुराधा सहस्त्रबुद्धे यांचा सजग पुरस्कार तर सर्पमित्र नीता गजरे-कुसळ यांचा साहस पुरस्काराने सन्मान

पुणे, दि. २९ जुलै, २०२४ : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणानुसार चांगल्या घरातील, पैसेवाली आणि उच्चशिक्षित आई-वडील असलेली मुले ही आज अनेक हिनस गुन्ह्यांमध्ये अपराधी असल्याचे दिसून आले आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना बालक म्हणता येते तर इतर काही संस्था १४ वर्षांखालील मुलांना बालक म्हणतात. नेमके बालक कोणाला म्हणायचे, या व्याख्येत असलेल्या गोंधळाचा फायदा आज अनेक गुन्हेगार घेतात, असे परखड मत माजी पोलीस महासंचालक डॉ प्रवीण दीक्षित यांनी मांडले. भ्रष्टाचार करीत अनेकदा अनेक जण या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी झटतात. पुण्यातील पोर्श कार अपघात आणि पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपण हा भ्रष्टाचार पाहिला आहे, असेही डॉ दीक्षित यांनी नमूद केले.

पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने टिळक रस्त्यावरील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दीक्षित बोलत होते. कार्यक्रमात हिंदू महिला सभेच्या वतीने आणि डॉ प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका डॉ अनुराधा सहस्त्रबुद्धे यांचा कै. लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ सजग पुरस्कार देऊन तर सर्पमित्र नीता गजरे-कुसळ यांना साहस पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, आपलं घर या संस्थेचे विजय फळणीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

साहस दिनाचे औचित्य साधत दरवर्षी हिंदू महिला सभेच्या वतीने साहस पुरस्कार दिला जातो. सदर वर्ष हे पुरस्काराचे चौथे वर्ष असून रोख रुपये —, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच आपलं घर या समाजसेवी संस्थेचे विजय फळणीकर यांच्या आई कै. लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ मागील वर्षीपासून सजग पुरस्कार देण्यात येत असून रोख रुपये —, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना डॉ दीक्षित म्हणाले, “ज्या मुलांना आई वडील नाहीत, जी मुले उघड्यावर मोठी होतात ती मुले पुढे जाऊन गुन्हेगार होतात हा आपल्या समाजातील समज हा पूर्णपणे चुकीचा आहे. आज चांगल्या घरातील, पैसे असलेली आणि उच्च शिक्षित आई वडील असलेली मुले ही अंगावर काटा येईल असे हिनस गुन्हे करण्यात अग्रेसर असल्याचे एका सर्व्हेक्षणात दिसून आले. माझ्या मते या परिस्थितीला ती मुले नाहीत तर त्यांचे पालक जबाबदार आहेत. या मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त कसे करायचे आणि सक्षम कसे करायचे यावर काम करावे लागणार आहे.”

आज लहान मुलांना पालकांनी वेळ देण्याची, मायेची ऊब देण्याची गरज आहे असे सांगत डॉ अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, “आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास करायचा असेल तर केवळ रस्ते, वीज आणून तो विकास होणार नाही. माणसांचा विकास होतोय का हे जास्त महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि महिलांसाठी पोलीस स्थानकात विशेष कक्ष व बालस्नेही अधिकारी असायला हवेत असे नियम असले तरी ते कागदावरच आहेत. विशेषतः बालगुन्हेगारांबद्दल संवेदनशीलता आज प्रशासनात दिसून येत नाही हे प्रकर्षाने जाणवते. लहान मुलांमध्ये लैंगिक शोषण, पॉर्नचे वाढते व्यसन या बाबींकडे आपण लक्ष देऊन त्याबद्दल मुलांमध्ये जागृती करायला हवी आहे.”

आपल्या समाजात उदमांजर, साप, मांडूळ या प्राण्यांबद्दल प्रचंड अंधश्रद्धा आहे. या चुकीच्या समजुतींमुळे अनेकदा प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. कोणताही प्राणी स्वतःहून माणसांवर हल्ला करायला येत नाही. जेव्हा त्याला जीवाचा धोका वाटतो तेव्हाच तो हल्ला करतो असे सर्पमित्र असलेल्या आणि आजवर तब्बल ७ हजार प्राण्यांचे प्राण वाचवीत त्यांना निसर्गात सुखरूप पोहोचविण्याचे काम करणाऱ्या नीता गजरे- कुसळ म्हणाल्या.

मी पोलीस आयुक्त असताना अनेक बालगुन्हेगारांना सक्षम करण्यावर भर दिला. त्यांना पुन्हा समाजात मिसळत यावे यासाठी कौशल्य शिकविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. समाजातील महिलांच्या संरक्षणासाठी आपण विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज सुशिक्षित नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी आहेत, असेही डॉ दीक्षित म्हणाले.

सुप्रिया दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मानपत्रांचे वाचन केले. सुधा राजगुरू यांनी आभार मानले, प्राची गोडबोले यांनी वंदे मातरम् सादर केले. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


VIEW POST

View more
Articles

सार्वजनिक सुरक्षा कायदा कायद्याची आवश्यकता

By on July 22, 2024

सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायद्याची आवश्यकता

मुंबई तरुण भारत

नुकतेच महाराष्ट्राच्या विधानसभेत सार्वजनिक सुरक्षा अधिनियम विधेयक सादर करण्यात आले. विरोधी पक्षांनी या विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाल्यास महाराष्ट्रात ‘पोलीसराज’ येईल, अशी हाकाटी उठवली आहे. पण, यानिमित्ताने नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे तपाासणे आवश्यक. त्यासाठी हा लेखप्रपंच…

https://www.mahamtb.com/Encyc/2024/7/19/public-security-act-maharashtra.html


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Articles

शालेय विद्यार्थ्यांना संदेश

By on July 11, 2024

शालान्त विद्यार्थ्यांना संदेश-

प्रवीण दीक्षित

शालान्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला व 95% पेक्षा अधिक गुण मिळवून खुप विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  यशस्वी होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, शाळेचे कर्मचारी ह्यांनी तळमळीने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन! विद्यार्थ्यांना रात्रंदिवस प्रोत्साहन देणारे त्यांचे पालक तसेच त्यांचे कुटुंबीय ह्यांचेही मी मनःपूर्वक कौतुक करतो.

शालान्त  परीक्षा झालेल्या मुलांसाठी त्यांच्या 20 व्या वाढदिवशी जपानमधे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी ज्याल सोजिन नो हाय डे म्हणतात, त्या दिवशी सेजिन शिकी  हा विशेष समारंभ आयोजित केला जातो. त्यामधे गावातील सर्व व्यक्ती, शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित असतात. त्या समारंभात मुलांकडून शपथ घेतली जाते की, मी आता प्रौढ झालो आहे व प्रौढ व्यक्तीप्रमाणे मी आता सर्व नियमांचे काटेकोर पालन करणार आहे. आपलया कडे सुद्धा अशाच प्रकारवा समारंभ आयोजित करून मुलांना प्रौढत्वाची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. 

बालमित्रांनो, मोठी स्वप्ने पहायला शिका व ती प्रत्याक्षात आणायचा प्रयत्न करा. मित्रांनो आता तुम्ही शाळेच्या संरक्षित वातावरणातून जगाच्या विस्तीर्ण अशा खुल्या वातावणात प्रवेश करत आहात. मला खात्री आहे, तुमच्या प्रत्येकाची काही स्वप्ने असतील. तुम्ही जरूर खूप मोठं व्हायची स्वप्न पहा. ही स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढील पाच वर्षात तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढी ती स्वप्ने प्रत्यक्षात येणे शक्य होणार आहे. ही स्वप्ने तुमच्या स्वतःची असु देत व त्यात पालकांनी सांगितले, मित्राने सांगितले, मैत्रिणीने सांगितले म्हणून मला अमुक अमुक व्हायचं आहे हा प्रकार कमी करा. तुमच्या पैकी अनेकांची काही स्वप्ने नसतीलही व पालकांनी सांगितले म्हणून एक विशिष्ट अभ्यासाची मी निवड केली आहे असे होऊ शकते. परंतु ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय व्हायचे आहे व त्या दिशेने तुम्ही लवकर प्रयत्न सुरू कराल तेवढा तुमच्या वेळेचा सदुपयोग होणार आहे. स्पर्धा परीक्षा हे त्यातील एक स्वप्न असू शकते. आज केवळ पुण्यामधे कमीतकमी 2 लाख तरूण मुलं मुली अशी आाहेत, ज्यांनी अभियांत्रिकी,  वैद्यकीय, कृषी किंवा अन्य व्यावसायिक  विषयात पदवीपर्यंत अभ्यास केला आहे व त्यानंतर त्याना असे वाटायला लागले की मी स्पर्धा परीक्षेमधे निवड होण्यासाठी प्रयत्न करावा. त्यातील अनेक मुलं गेली 8 ते 12 वर्ष पदवी मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करीत आहेत. मित्रांनो 12 वर्षात तुम्ही बारावी पूर्ण होता. पण पदवी मिळाल्यानंतर 8-12 वर्ष अशा प्रकारे प्रयत्न करणे हे तुमच्या वैय्यक्तिक आयुष्यात तुम्हाला, कुटुंबाला व राष्ट्राला परवडणारे नाही. केवळ वेळच नव्हे तर तुमची आर्थिक, शारिरीक, मानसिक दमछाक होणार आहे. हे टाळायचे अ‍सेल तर व्यावसायिक शिक्षणक्रम करत असतानाच मुक्त विद्यापिठातून तुम्ही अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास असे स्पर्धा परीक्षेस उपयोगी विषय घेऊन दुसरी पदवी घेऊ शकता व पाच वर्षातच तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकता. स्पर्धा परीक्षा ह्या भारत सरकाारर तर्फे संघ लोकसेवा आयोग घेत असते तर राज्यात राज्य लोकसेवा आयोग ह्या परीक्षा घेत असते. दर वर्षी लाखो तरूण स्पर्धा परीक्षा देऊन उत्तम नोकरी मिळवीत आहेत. ह्याची तयारी करण्यासाठी पुण्यातील अनेक संस्था मार्गदर्शन करीत आहेत.  आर्थिक टंचाईमळे कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला अडथळा येऊ नये ह्यासाठी ज्यांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही अशा तरूणांसाठी महाराष्ट्र शासनाने अमृत ही संस्था सुरू केली आहे व त्या मार्फत अशा उमेदवारांना भरघोस आर्थिक मदत दिली जाते. आरक्षित उमेदवारांसाठी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था शासनातर्फे काम करत आहेत.

 मित्रांनो, ही स्वप्ने पाहतांना मला अपयश येईल का ही भीती प्रत्येकाच्या मनात असते. परंतु त्या भीतीवर प्रयत्न करून विजय मिळविणे आवश्यक आहे. या भीतीने अनेक मुले मुली खचून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. मित्रांनो, अपयशावर मात करणे हाच पुरुषार्थ आहे व त्यासाठी तुमचं आत्मबळ प्रखर असणे आवश्यक आहे. निराशा, भीती ह्याच्यावर मात करायची असल्यास रोज देवाची प्रार्थना करा, चांगला व्यायाम करा. वेळेचे चांगले नियोजन करा, योग्य वेळेस घरचे चांगले जेवण जेवा व किमान 6 ते 7 तास शांत झोपा त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहील, मन शांत राहील एकाग्रता वाढेल  व येणार्‍या कोणत्याही अडचणीवर, अपयशावर तुम्ही सहजपणे मात करू शकाल. मित्रांनो,

सुवर्णपुष्पितां पृथ्वीं विचिन्वन्ति त्रयो जनाः

शूरश्च कृतविद्यश्च, यश्च जानाति सेवितुम् ।।

 म्हणजे सोन्याने मढलेली ही पृथ्वी तीन प्रकारच्या व्यक्ती उपभोगू शकतात. हे तीन जणं म्हणजे, जो शूर आहे, सुविद्य आहे व जो सेवा करू शकतो. हे करत असताना प्रयत्नपूर्वक काही धोक्यांना टाळणे आवश्यक आहे. जसे नशा आणणारे आमली पदार्थ, दारू, सिगारेट, —इत्यादि. ही व्यसने अशी आहेत की जी मित्रांमुळे, निराशेमुळे, गम्मत म्हणून एखाद्या व्यक्तीने अंगिकारली तरीही त्यातून त्यांची कधी सुटका होणार नाही. व्यसनाांचा शेवट एकच आहे आणि तो म्हणजे स्वतःचा पूर्ण विनाश!

 मित्रांनो, यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्त्वं अविवेकिता।

एकैकं अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।

म्हणजे तरूणपण, धनदौलत, अधिकार आणि सारासार विचाराचा अभाव ह्यातील एक गोष्टही व्यक्तीचा नाश करते, जिथे चारही गोष्टी एकत्र येतील तेथे नाशही विजेच्या वेगाने होत असतो. पोर्शे गाडी अपघातासारखी प्रकरणे सध्या सर्वत्र गाजत आहेत. व्यसनाधिनता, तारुण्य व अविवेकिता ह्यांचे हे बळी आहेत. 18 वर्षाचे होईपर्यंत वाहन चालवण्याचा मोह टाळा. विरुद्ध दिशेने प्रवास करू नका. हेल्मेट वापरा अन्यथा भारतात दरवर्षी 2 लाख व्यक्तींचा जीव जातो. त्यापैकी तुम्हीही एक असू शकता.

बालमित्रांनो, प्राचीन भारतात गुरुकुलातील अभ्यास संपल्यानंतर गुरू विद्यार्थ्यांना जो उपदेश करीत तो तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीच्या 11 व्या अनुवाकामध्ये दिला आहे त्याचे सुरवातीचे दोन मंत्र खालीलप्रमाणे आहेतः

सत्यं वद। धर्मं चर। स्वाध्यायान्माप्रमदः । सत्यान्नप्रमदितव्यम्। धर्मान्नप्रमदितव्यम्। कुशलान्नप्रमदितव्यम्। स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्।

त्याचा अर्थ असा, खरेपणाने वागण्यात चूक करू नकोस. धर्माच्या विपरीत म्हणजे नियमांविरुद्ध वागू नकोस. कौशल्ये वाढत राहतील ह्याची खात्री कर. ऐश्वर्य प्राप्त करू देणार्‍या मंगल कामांना सोडू नकोस. स्वाध्याय आणि प्रवचन ह्याची हेळसांड करू नकोस. शेवटी गुरू सांगतात, – ‘‘यानि अस्माकं सुचरितानि । तानि त्वया उपास्यानि’’ आमचे जे जे चांगले अनुकरणीय आचरण आहे त्यांची तू उपासना कर. बाकीच्याची नको. 

मित्रांनो, तुमच्या उत्कृष्ट प्रयत्नांनी, तुमच्या पालकांना, शिक्षकांना, शाळेला व देशाला अभिमान वाटेल अ‍से यश संपादन करा. तुमच्यापैकी प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा!

***************   ************   **************