स्वातंत्र्य मिळल्यानंतर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींच्या काळात भारतातील अंतर्गत सुरक्षा अनेक कारणांनी डळमळीत होती. कधी पाकिस्तान, कधी चीन, भारतावर आक्रमण करीत होते तर कधी अंतर्गत भाषांवरून, धर्मावरून, जातींवरून, राज्य पुनर्रचनेवरून भीषण अशा दंगली उसळत होत्या. हे कमी की काय म्हणून अन्नधान्याच्या कमतरतेमुळे धान्य वाटपावरून आगडोंब उसळत होता. पाकिस्तानच्या पूर्व…